ढेकळफेकी
गेली काही दिवस खुप धावपळीत गेली. महिन्याभरापूर्वी पुण्याला मित्राचे लग्न होते. तिकडे गेल्यामुळे आर्थिक गणिते बिघडली. दुकान बंद केल्यामुळे अनेक ग्राहक तुटले. तसेही सिमकार्ड विक्री हा धंदा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो काही भाजीपाला नाही जो दरारोज अनिवार्य आहे. प्रत्येक धांद्यामध्ये आज कॉम्पिटिशन वाढलेली दिसेल. शहरात एकही छत्री लागत नव्हती तेव्हापासून चौकात बसून हा धंदा वाढवला. ऊन वारा पाऊस हे न पाहता रस्त्यावर बसून काम करायचो; तेव्हा येणारे जाणारे ओळखी अनोळखीचे लोकं आश्चर्याने बघायची. असाही एखादा धंदा असतो यावर त्यांचा विश्वास बसायचा नाही. रिकामी फिरस्ती पोरं माझ्याजवळ यायची आणि कामाविषयी साविस्तर विचारायची; तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी सर्व काही सविस्तर सांगायचो. आणि तुम्ही पण हा व्यवसाय सुरू करा, असा फुकटचा सल्ला द्यायचो. आज तीच पोरं माझ्या नाकावर टिच्चून महीना ३० ते ३५ हजार रु कमावताना दिसतात. असो, परंतु आपल्यामुळे बऱ्याच लोकांचे परिवार जागेवर आले. त्यांची रोजीरोटी सुरळीत झाली याच काहीस समाधानही आहे. एक गोष्ट तितकीच खरी आहे की जेंव्हा एखाद्याचा वाईट काळ सुरू असतो तेव्ह...