मस्साजोग येथील क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ बीड जिल्हा कडकडीत बंद ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील लोकनियुक्त सरपंच कै . संतोष देशमुख यांची दिनांक ०९/१२/२०२४ रोजी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली . या घटनेला बराच काळ उलटून गेला तरी मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत .
मागील काही महिन्यापासूनची बीडची परिस्थिती पाहिली तर
तेथे खंडणीसाठी व्यापारी व व गुत्तेदारांच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे . शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जात आहे .
कायदा व सुव्यवस्था अडचणीत आली आहे .
अशा घटना पाहता बीडचा बिहार झालाय काय की अशी भावना बीड व परिसरातील लोकांची झाली आहे .
बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस , व्यापारी , अधिकारी आज दडपणाखाली जीवन जगत आहेत तेथील सर्वसामान्य माणसांना , व्यापाऱ्यांना , गुत्तेदारांना व अधिकाऱ्यांना भयमुक्त करायचा असेल .
तर महाराष्ट्र सरकारने असे गुन्हे करणारे आरोपी व त्यांना पाठीशी घालून सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी व स्थानिक पोलीस प्रशासन याची सखोल चौकशी करून दोषींवर
कडक कार्यवाही करावी .
अशी मागणी सकल मराठा समाज व बीड जिल्ह्यातील समस्त जनता यांच्या वतीने आज करण्यात आली आहे .
या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण बीड जिल्हा उदया दिनांक १३/१२/२०२४ ला बंद राहणार आहे.
Comments
Post a Comment